
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास
ऊज्वल ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि अलॊकिक नैसर्गिक लावण्यांनी सजलेला जिल्हा म्हणजेच आपला सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तुत्वाची, हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याने ओळखला जाणारा आपला अभेद्य सिंधुदुर्ग. १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्हाचे विभाजन करून कोकण विभागाचा आर्थिक विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. पूर्वेला भक्कम अभेद्य अशा पर्वतराजीनी नटलेला आणि पश्चिमेला पसरलेला 1२०कि.मि.चा विस्तीर्ण निळाशार सागर किनारा, देवगड, वैभववाडी ,कणकवली, मालवण, वेंगुर्ला , कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग, या ८ तालुक्यांनी आणि ७४३ गावांनी वसलेला आपला सिंधुदुर्ग. Read more …

श्री देवी भराडी, आंगणेवाडी
आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली, की महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून नव्हे, तर परराज्यांतूनही हजारो भक्त दोन दिवसांच्या त्या यात्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात. लाखो भक्तांची मांदियाळी फुलून जाते. कोकणातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावाचे दैवत वैशिष्टपूर्ण आहे. आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणे देखील आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले.


राजवाडा सावंतवाडी
सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला गेलेला आहे. सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युसिअम. सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते
श्री देव कुणकेश्वर देवगड
श्री क्षेत्र कुणकेश्वर…. कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र…अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी… कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर… देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्याशी असणार्या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.


स्नॉर्कलिंग, मालवण

वालावल बॅक वॉटर

श्री लक्ष्मीनारायण,वालावल

श्री देव रामेश्वर

फ्लेमिन्गो @ दांडी बीच

पारंपारिक रापण व्यवसाय
आमचे मार्गदर्शक

सौ.निला लाड
माजी संचालक पर्यटन मंत्रालय भारत सरकार

श्री.उदय कदम
महाराष्ट्र पर्यटन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन

श्री.मानसिंग पवार

श्री. रामचंद्र वरक
पर्यटन व्यवसायिक महासंघ

अध्यक्ष श्री.बाबा मोंडकर 9421153035

कार्याध्यक्ष: श्री.सतीश पाटणकर 855180999

सचिव: ऍड नकुल पार्सेकर 9422374205

खजिनदार:श्री.गुरुनाथ राणे

श्री. किशोर दाभोलकर, सोशल मिडिया 9404347199

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. संजय काशीद, 95521 17820

श्री.जितेंद्र पंडित अध्यक्ष सावंतवाडी तालुका 8087725255

श्री.अविनाश सामंत अध्यक्ष मालवण तालुका 9404172197

कोकण संघटक श्री.संजय नाईक 9423963175